दरमहा फक्त ₹4000 गुंतवा आणि मिळवा ₹2.85 लाख! सरकारची हमी असलेली पोस्ट ऑफिस ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का?
Post Office RD Scheme
Post Office RD Scheme : आपल्यापैकी कितीतरी जणांना असं वाटतं की लाखो रुपयांची बचत करायची तर मोठं उत्पन्न असायलाच हवं. मात्र आता ही संकल्पना मागे पडते आहे. कारण अगदी दर महिन्याला ₹4000 इतकी मर्यादित रक्कम गुंतवून देखील तुम्ही पाच वर्षांत जवळपास तीन लाखांचा हमी परतावा मिळवू शकता – तेही कोणतीही जोखीम न घेता. ही किमया शक्य होते पोस्ट ऑफिसच्या ‘Recurring Deposit’ म्हणजेच आरडी योजनेमुळे.
ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते आणि त्यामुळे गुंतवणुकीवर संपूर्ण शासकीय हमी असते. त्यामुळे जोखमीचा प्रश्नच उद्भवत नाही. दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करत राहिल्यास, व्याजासह मोठी रक्कम मिळते. सध्या या योजनेवर ६.७% वार्षिक व्याज दिलं जातं, जे तिमाही आधारावर कंपाउंड केलं जातं.
उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या व्यक्तीनं दरमहा ₹4000 या प्रमाणे ५ वर्षे आरडीमध्ये गुंतवणूक केली, तर एकूण गुंतवलेली रक्कम होते ₹2,40,000. या रकमेवर अंदाजे ₹45,459 इतकं व्याज मिळतं. म्हणजे शेवटी हातात येणारी रक्कम असते ₹2,85,459. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक, सुरक्षित आणि सोपी आहे.
खाते उघडण्यासाठी लागणारी प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे. जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी खाते उघडता येतं. त्यासाठी फक्त आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो आणि ओळख पुरावा आवश्यक आहे. अनेक जणांकडे आधीपासून पोस्ट ऑफिसचे बचत खाते असते, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रक्रिया अधिकच सुलभ होते.
या योजनेत मिळणारे व्याज करपात्र असले तरी, जर गुंतवणूकदाराचं एकूण उत्पन्न करमर्यादेपेक्षा कमी असेल, तर १५जी किंवा १५एच फॉर्म भरून TDS वगळता येतो. त्यामुळे कोणतीही कर कपात न करता पूर्ण रक्कम हातात मिळते.
हे पण वाचा : २५ वर्षांनी झी मराठीवर कमबॅक! ‘ही’ अभिनेत्री पुन्हा मालिका गाजवण्यासाठी सज्ज
ही योजना कोणासाठी योग्य?
या योजनेचा लाभ अगदी सर्वसामान्य व्यक्तींनी घ्यावा, यासाठी ती रचना करण्यात आली आहे. दर महिन्याची बचत करू शकणारे नियमित नोकरदार, गृहिणी, छोट्या व्यावसायिकांपासून ते ग्रामीण भागातील बचतदारांपर्यंत कोणतीही व्यक्ती सहज सहभाग घेऊ शकते. लहान रक्कम साठवत साठवत, पाच वर्षांत एक चांगला निधी तयार होतो – जो पुढील आर्थिक गरजांसाठी उपयोगी पडतो.
सरकारी योजना असून देखील या योजनेचा प्रसार अद्याप सर्वत्र झालेला नाही.
त्यामुळे अशा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं आवश्यक आहे. आरडी योजना ही पैसा सुरक्षित ठेवण्याचा आणि भविष्यासाठी शाश्वत निधी उभारण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
